शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

दिवाळीतील दिवे लागण !

 दिवाळीतील दिवे लागण !















दिवाळी गुंजेला,
माझ्या आजोळीच होत असे,
पुसद जवळचे हे छोटेसे गाव.
गढी आणि तिथले चार वाडे.
लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला आजी-मामी संध्याकाळी दिवे लावत.

तीन मोठ्या परातीमध्ये सगळ्या पणत्या ..

पेटवत एक एक पणती ठराविक ठिकाणी ठेऊन यायची.

कधी आम्हीही हे काम हौसेनं करायचो. पण नेमकी कुठली तरी जागा राहून जायची
पणती ठेवणं विसरून जायचं.

पणत्या लावून आलो की ! विचारायची .. उंबरापाशी लावली? हौदाजवळ? विहिरीपाशी ?
हो हो म्हणताना एखादं ठिकाण राहून जायचं ..
पुन्हा तिथे जाऊन पणती ठेवून यायची .. जवळपास पन्नास एक दिवे लागायचे
गढीच्या प्रवेशापाशी असलेल्या चांद खान महाराज पीरापासून ते
बाजूस असलेल्या उकिरड्या पर्यंत.
वेगळी गंमत ..

गढीही तशी उरली नाही,

आजी गेली, मामा देखील कितीतरी वर्षांपूर्वी पुसदला स्थायिक झाला,
दिवाळी विरली ती कायमची. मात्र तसे दिवे-पणत्या लावण्याचा परिपाठ अजूनही आहे.
तो इथे औरंगाबादला.. आता आई विचारते ..
जवळ लावला? बेलापाशी ? गच्चीचे दार .. आणि आवळी जवळ?
एक तरी जागा राहतेच जिथे विसरायला होतं !
अर्थाने दिव्यांचा सण होतो..
पाच पणत्या लावाव्या ना !
... घरातल्या मोठ्यांना कोण सांगणार !
ते वास्तुपुरुषाची जागा
अंगणातील मुख्य दार ते मागच्या
सदृश जागेचे दार ..
दिवे पेटले पाहिजे...
उजेड दिसला पाहिजे.
समाधान... समाधान कशाचं... ?
? खूप पणत्या लावल्याचं ?
(!) -परंपरा जतनाचं, की ...
समाधान असतं नक्की !
दिवाळीचा शेवटचा दिवस
आठवण घेऊन आला.

***

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...